Category: Blog

Your blog category

फेसबुकवर “श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर” यांच्याविरोधात अर्वाच्च भाषेतील पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल — वंचित बहुजन आघाडी व आंबेडकरी कार्यकर्त्यांचा निषेध

पंकज सरोदे पाथरी (जि. परभणी) – प्रतिनिधी फेसबुक या सोशल मीडियावर “श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर” यांच्या विषयी अर्वाच्च, अपमानास्पद व भडकाऊ भाषेत पोस्ट व कमेंट करून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या प्रताप…

भारताचे माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी पुण्यतिथी व भारताचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेसतर्फे अभिवादन कार्यक्रम

मोहसीन आतार ( प्रतिनिधी ) सोलापूर, दि. ३१ ऑक्टोबर २०२५ सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त आणि भारताचे माजी गृहमंत्री लोहपुरुष सरदार…

प्रामाणिकपणे काम करणाऱ्या तरुण नेतृत्वाकडे प्रभाग ३ चा वाढता विश्वास

शिवाजी (आप्पा) पवार पुणे जिल्हा प्रतिनिधी इंदापूर शहरातील तरुण, संयमी आणि शांत स्वभावाचा चेहरा म्हणून सौरभ लक्ष्मण शिंदे यांचे नाव आज सर्वांच्या ओठांवर आहे. शिक्षण, संस्कार आणि समाजकारण यांचा सुंदर…

*”जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा” हाच माझ्या आयुष्याचा मार्गदर्शक मंत्र* : – *प्रसिद्ध आर्किटेक्ट व जनसेवक श्री.वसंतराव मालुंजकर यांचे प्रतिपादन.*

(*नगराध्यक्षपदाची संधी मिळाल्यास इंदापूर शहराचा कायापालट करणार.* – *श्री. वसंतराव मालुंजकरांची स्पष्टोक्ती*)

(*पत्रकारांशी मनसोक्त संवादात दिली माहिती.)*

*शिवाजी (आप्पा) पवार पुणे जिल्हा प्रतिनिधी*

   हजरजबाबीपणा हा बुद्धी चातुर्याचा गुण आर्किटेक्ट श्री. वसंतराव मालुंजकरांकडे असल्याने तल्लक विलक्षण बुद्धीमत्तेच्या जोरावर समोरच्या व्यक्तीच्या मनात आपलं स्थान निर्माण करणं हे त्यांचं खास कौशल्य. कोणत्याही प्रसंगात मिश्किल, विनोदी शैली त्यांच्या वाणीत पहावयास मिळते. नेतृत्व, साहस, बुद्धीमत्ता, चातुर्य आणि निर्णय क्षमता हे इंजिनिअर व जनसेवक श्री. मालुंजकर साहेबांच्या बुद्धीचातुर्यातून सहज दिसून येते.
महाविद्यालयीन जीवनातच श्री. मालुंजकर यांना सामाजिक कार्याची गोडी लागली. आपल्या बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःची आगळीवेगळी ओळखं निर्माण करणारं अष्टपैलू,संवेदनशील, प्रामाणिक आणि बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजेच प्रसिद्ध आर्किटेक्ट व जनसेवक श्री. वसंतराव मालुंजकर साहेब होय.
इंदापूर तालुक्याच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे
इंदापूरचे सुपुत्र, माजी खासदार श्रद्धेय कै. शंकरराव पाटील (भाऊ), माजी आमदार कै. गणपतराव (बापू) पाटील, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री.प्रदीपदादा गारटकर या समाजसेवकांचा श्री. वसंतराव मालुंजकरांना बहुमोल सहवास लाभला. तसेच या नेत्यांचे मोलाचे मार्गदर्शन देखील लाभले. म्हणूनच त्यांना इंदापूर शहराच्या सामाजिक,राजकीय, विकासात्मक क्षेत्रात गेली दोन दशकांहून अधिक काळ निष्ठेने अविरत काम करण्याची संधी मार्गदर्शक श्री.प्रदीपदादा गारटकर, कृषिमंत्री ना.दत्तामामा भरणे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार साहेब व शहरातील मायबाप जनतेमुळे मिळाली.
श्री.मालुंजकर सन २०१० साली पक्षाच्या तिकिटावर इंदापूर नगरपालिकेत नगरसेवक पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले. निवडणुकीत २२ मतांनी पराभवाला सामोरं जावं लागलं. जनतेचा कौल मान्य करत. पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागले.शहरातील नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेत  शहराच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतला.
२०१६ च्या नगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते श्री. प्रदीपदादा गारटकरांनी विश्वास ठेवत जनसेवक श्री. मालुंजकर यांच्या पत्नी सौ. हेमलता मालजुंकर यांना पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याची संधी दिली. या निवडणुकीत प्रभागातील मतदारांनी विजयाचा कौल सौ. हेमलता वसंतराव मालुंजकर यांना दिला. त्यानंतर  आपल्या प्रभागात विकासाची घोडदौड सुरू झाली. साडेचार कोटी रुपयांची विकासकामे प्रभागात केली.
आय कॉलेज ते दर्गा मस्जिद चौक आणि दर्गा मस्जिद रोड ते टेंभुर्णी नाका हे दोन महत्त्वाचे रस्ते तयार करण्यात आले. (४० फुटी रोड.)
प्रभागातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण,ड्रेनेज, नवीन विद्युतीकरणासाठी पोल, घनकचरा व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन, आदी कामे नगरसेवक पदाच्या कार्यकाळात मजबुतीने केली.व्हि.डी.कन्सल्टंट मार्फत घरकुल योजना धारकांना बांधकामासाठी प्लॅन व इस्टिमेट आर्किटेक्ट श्री.मालुंजकर यांनी विनामूल्य तयार करून दिले.
श्री.वसंतराव मालुंजकरांचे व्हि.डी कन्सल्टंट हे  पुणे, सोलापूर ,नाशिक, अहिल्यानगर,व सातारा जिल्ह्यामध्ये विश्वसनीय व प्रगत असं फर्म आहे. फर्मच्या माध्यमातून अनेक आर्किटेक्ट, सिव्हिल इंजिनिअर तरुण – तरुणींना रोजगार देऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्याकरिता मोलाचं योगदान मिळालं.
शहरातील गणेश मंडळांना, दहीहंडी ग्रुप, विविध सामाजिक उपक्रमांना, आरोग्य शिबिरांना तसेच कोरोना काळात देखील गोरगरिबांना सर्वतोपरी मदत सामाजिक बांधिलकी जपत जनसेवक श्री. वसंतराव मालुंजकर यांनी केली.
यंदाच्या होऊ घातलेल्या इंदापूर नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत थेट नगराध्यक्ष पदाच्या चुरशीच्या निवडणुकीत श्री.वसंतराव मालुंजकरांच नाव आघाडीवर चर्चिले जात असल्याची चर्चा इंदापूर शहरात रंगत आहे.
१) स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट शहर उभारणे.२) बेरोजगारांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे.३) शिक्षण,आरोग्य आणि पिण्याच्या पाण्याच्या सोयी सुधारणे ४) प्रशासन जनतेच्या दारात नेणे. हाच ध्यास जनतेची सेवा करताना राहील.प्रत्येक घरात दिवा कायम उजळत राहावा. प्रत्येक रस्ता स्वच्छ व सुरक्षित असावा आणि प्रत्येक नागरिकाचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचावा हेच माझे ध्येय राहील.
जनतेचा विश्वास  – माझी शक्ती
शहराचा विकास – माझा संकल्प.
चला, आपण सगळे मिळून एक प्रगत स्वच्छ आणि सशक्त शहर उभा करूया कारण – 
” जनसेवा हीच ईश्वर सेवा!”

“जनसेवा हीच ईश्वर सेवा” – हा केवळ एक विचार नाही, तर माझ्या आयुष्याचा मार्गदर्शक मंत्र आहे, समाजाच्या सेवेतून, लोकांच्या समस्यांचे निराकरण करताना मिळणारा समाधानाचा अनुभव हाच खरा ईश्वर प्राप्तीचा मार्ग आहे ,असा माझा ठाम विश्वास आहे.अशा शब्दांत पत्रकारांशी संवाद साधताना इंदापूरचे प्रसिद्ध आर्किटेक्ट व जनसेवक श्री.वसंतराव मालुंजकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

शेकडो वर्षाची वारकरी परंपरा रेडा गावातील पवार कुटुंबातील तिसरी युवा पिढीने चार दशकापासून जोपासली. – ह. भ. प.रावसाहेब शिपलकर

रेडा गावातील पवार कुटुंबाच्या स्वागताने वारकरी गेले भारावून

कोल्हापुरी फेटे, चहापाणी, फटाक्याची आतिषबाजीने स्वागत

शिवाजी (आप्पा) पवार पुणे जिल्हा प्रतिनिधी

रेडा (ता. इंदापूर, पुणे) श्री क्षेत्र – नागेश्वर मंदिर ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा हा अहिल्यादेवीनगर जिल्हा श्रीगोंदा तालुक्यातील कौठा येथून कार्तिक शुद्ध-३  शुक्रवार दि.२४ ऑक्टोंबर २०२५  रोजी पंढरपूरकडे कार्तिकी वारीसाठी प्रस्थान झाला असून (दि.२८) ऑक्टोंबर रोजी रेडा गावात श्री क्षेत्र नागेश्वर दिंडी सोहळ्याचे आगमन होताच तोफांची सलामी देऊन फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.पवार कुटुंबाचे प्रमुख माजी ग्रामपंचायत सदस्य सुखदेव पवार  दिंडी सोहळ्याचे प्रमुख व सोहळ्याचे स्वागत केले. महिलांनी तुळशी पूजन करून दिंडी सोहळ्यातील महिलांचे स्वागत केले. श्री क्षेत्र नागेश्वर दिंडी सोहळ्याचे हे ४८ वर्ष असून रेडा गावातील पवार कुटुंब हे कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर कडे जाणाऱ्या शेकडो वारकऱ्यांचे स्वागत करत असतात.

शेकडो वर्षाची  वारकरी परंपरा पवार कुटुंबातील तिसरी युवा पिढीने गेली चार दशक कार्तिकी एकादशी निमित्त जाणाऱ्या श्री क्षेत्र नागेश्वर दिंडी सोहळ्याचे स्वागत व सेवा करण्याची परंपरा जपली असून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना कोल्हापुरी फेटे बांधून, चहापाणी, फटाक्याची आतिषबाजीने स्वागत करत असतात. या स्वागताने अक्षरशः वारकरी मंडळी भारावून जातात. दिंडी सोहळ्यातील महिलांना व मानाचे मानकरी यांना कोल्हापुरी फेटे बांधून स्वागत केल्याने महिला मंडळींच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत होता.

आषाढी वारी, कार्तिकी व वारीसाठी लाखो वारकरी मंडळी पंढरपूरकडे विठ्ठल दर्शनाची आस घेऊन अक्षरशा ऊन, वारा, पाऊस, संसाराची तमा न करता, देहभान विसरून पंढरपूरकडे जात असतात.

गुरुवर्य निवृत्ती (आण्णा)शिपलकर, वै. गुणाईमाता निवृत्ती शिपलकर यांच्या प्रेरणेने हा दिंडी सोहळा पंढरपूरकडे पायी वारी गेली ४८ वर्ष करत आहे. त्यामध्ये ह. भ. प. दत्तात्रय महाराज शिपलकर, सोमनाथ महाराज शिपलकर, रावसाहेब शिपलकर (गुरूजी), भानुदास दातीर महाराज, हरी घोडके, विणेकरी कुमार काका कुलकर्णी, चोपदार हनुमंत नारायण शिपलकर, संजय कुदळे, बाळासाहेब ढोके, वामन रांहीज,भीमसेन खरात, बाळासाहेब लगड, कैलास देशमुख, प्रकाश परकाळे, बाळासाहेब ढोके,मंगल मोटे,सुरेखा जठार, वनिता गिरमकर,सविता पवार, स्पीकर व्यवस्था संजय पवार आदी वारकरी मंडळींनी वारीतील अनुभव कथन केले.

त्याचप्रमाणे ह.भ.प. बबन पवार महाराज (ट्रेलर), बाळासाहेब नागवडे यांनी बहारदार भारुडाचा आणि भजनाचा कार्यक्रम सादर केला. विठ्ठलाच्या चरणी एवढीच आम्ही प्रार्थना करतो की, शेतकरी आणि सर्व सामान्यांना  सुख, समाधान शांती लाभू दे, आणि जन्मोजन्मी आमच्या घराण्याकडून वैष्णव सेवा घडू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करत पवार कुटुंबाकडून भावना व्यक्त केल्या. श्री क्षेत्र नागेश्वर दिंडी सोहळा हा पवार कुटुंबाच्या पाहुणचार घेतल्यानंतर रेडा गावातील जालिंदर देवकर यांच्या निवासस्थानी मुक्कामाकडे मार्गस्थ झाला.

श्री क्षेत्र दिंडी सोहळ्याचे  ४८ वे वर्ष-ह.भ.प. रावसाहेब शिपलकर(गुरुजी)

श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर कौठा पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे हे ४८ वर्ष असून ऊन, वारा, पाऊस, संसार याचे देहभान विसरून
पंढरपुरकडे पंढरीच्या दर्शनासाठी हे वारकरी मंडळी निघाले आहेत. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाच्या आस घेऊन वारकरी निघाले आहेत. गेले ४० वर्षे रेडा ग्रामस्थ ज्या पद्धतीने स्वागत करतात अक्षरशः आम्ही सर्व वारकरी मंडळी भारावून जातो.

रेडा गावात आल्यानंतर आम्हाला आमच्या घरी आल्यासारखा अनुभव वाटतो. रेडा गावातील पवार कुटुंब गेली शेकडो वर्षाची वारकरी परंपरा पवार  घराण्यातील तिसरी  युवा पिढीने चार दशकापासून परंपरा जोपासली आहे ही सोपी गोष्ट नाही. अनेक जन्मांच पुण्य असल्यानंतरच अशी सांप्रदायिक आणि वारकऱ्यांची सेवा करणारी पिढी जन्म घेत असते. परमेश्वराच्या भेटीच्या ओढीने हा दिंडी सोहळ्यातील प्रत्येक वारकरी पायी चालत असतो. पंढरपूर मध्ये दिंडी सोहळा पोहोचल्यानंतर चार दिवस  संतराज मठ  पंढरपूर येथे मुक्काम असणार आहे. नगर प्रदक्षिणा करून, गोपाळ काला करून पुन्हा दिंडी सोहळा कौठा श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर कडे परतीचा प्रवास सुरू करणार आहे.

रेडा गावातील ग्रामस्थांचे स्वागत इतर कुठेच नाही-ह.भ.प. दत्तात्रय शिपलकर

गेली ४१ वर्ष रेडा गावातील ग्रामस्थ प्रेमाने आणि आनंदाने स्वागत करतात असे स्वागत व सेवा हे दिंडी प्रस्थान ते पंढरपूर पर्यंत इतर कुठेच होत नाही. गेली कित्येक वर्ष रेडा गावातील पवार परिवाराचे प्रमुख सुखदेव पवार आणि त्यांचे पुत्र पत्रकार कैलास पवार हे आमच्या दिंडी सोहळ्याचे अतिशय मोठ्या उत्साहात स्वागत करतात. दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत केले जाते. मोठ्या प्रमाणात फेटे बांधून, फटाक्याची आतिषबाजीने आमचे स्वागत केले. आमच्या दिंडी सोहळ्यातील प्रत्येक वारकरी अक्षरशः भारावून जातो.प्रत्येक वारकरी हा रेडा गावातील पवार कुटुंबाच्या स्वागताने सुखावून जातो.

_________

29 oct

बेवनूर सोसायटीच्या लेखापरीक्षण अहवालात आढळल्या त्रुटी**सचिव कुलकर्णीवर कारवाई करण्याची मागणी* चांगदेव काळेल ता.जत येथील बेवनूर विकास सेवा सोसायटीत लेखापरीक्षण अहवालात अनेकत्रुटी आढळल्याने सचिवावर कारवाईची करण्याची मागणी सभासदांकडून करण्यात आलेली आहे.याबाबतची…

“वाचन संस्कृतीचा अनोखा उपक्रम — महेंद्र सरोदे सर यांच्या हस्ते दिवाळी अंकांचे वितरण”          गणेश कांबळे
फुरसुंगी (ता.हडपसर) येथे वाचन संस्कृती जोपासण्यासाठी एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक महेंद्र सरोदे सर यांच्या पुढाकाराने दिवाळी अंक वाचकांना विनामूल्य वितरित करण्यात आले.

या उपक्रमाचा उद्देश समाजात वाचनाची आवड वाढवणे आणि साहित्यिक संस्कृती जपणे हा होता. दिवाळी अंक हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून विचारांना चालना देणारे, सामाजिक व साहित्यिक जाणिवा जागृत करणारे माध्यम आहेत.

या उपक्रमामुळे –

नवीन पिढीला दर्जेदार वाचनाची गोडी लागली,

स्थानिक लेखकांना प्रोत्साहन मिळाले,

आणि “वाचन हीच खरी संस्कृती” ही भावना सर्वांच्या मनात दृढ झाली.


कार्यक्रमास फुरसुंगी गावातील अनेक तरुण, विद्यार्थी आणि प्रौढ वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले व महेंद्र सरांच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले.

“महेंद्र सरोदे सर” यांच्यासारख्या शिक्षकांनी घेतलेली अशी पुढाकार समाजाला वाचनाच्या दिशेने पुन्हा प्रवृत्त करते आणि संस्कारमय समाज निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी ठरते.

बाजारमळा परिसरात घटना ; घरातील रोख रक्कम आणि सोन्याचांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले…

सुनिल थोरात लोणी काळभोर : दिवाळीनिमित्त सर्वजण मूळगावी गेल्याचा मोका साधून अज्ञात चोरट्यांनी बंद घरात घरफोडी करत रोख रकमेसह सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना लोणी काळभोर (ता.…

फुलसावंगी एसटी बसस्टॉपची दुरवस्था – प्रवाशांची गैरसोय, अपघाताचा धोका वाढला!
       श्याम शिंदे
महागाव तालुका प्रतिनिधी

महागाव तालुक्यातील फुलसावंगी हे तालुक्यातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक केंद्र असून, येथील बाजारपेठेत दररोज शेकडो प्रवासी ये-जा करतात. मात्र, राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) फुलसावंगी येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था झाल्याने प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

स्थानिक नागरिक आणि प्रवाशांच्या मते, फुलसावंगी येथील एसटी प्रवासी निवारा व बस थांबा अत्यंत जीर्णावस्थेत असून, छप्पर तुटलेले, बसण्याची व्यवस्था नसलेली आणि परिसरात स्वच्छतेचा अभाव आहे. विशेष म्हणजे, अनेक वेळा बस या विरुद्ध दिशेने थांबत असल्याने अपघाताचा गंभीर धोका निर्माण होत आहे.

प्रवाशांचे म्हणणे आहे की, “एसटी बस नेहमी प्रवासी निवारापासून थोड्या अंतरावर किंवा उलट्या दिशेला थांबतात, त्यामुळे रस्ता ओलांडताना अपघाताची शक्यता वाढते. विशेषतः शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे.”

स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे लवकरात लवकर फुलसावंगी एसटी बस स्टॉपची दुरुस्ती करून प्रवासी निवाऱ्याची सुधारणा करण्याची मागणी केली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, एसटी बस प्रवासी निवार्‍यासमोरच थांबावी, तसेच बसथांब्याची स्पष्ट निशाणी, बसण्याची सोय आणि सुरक्षित पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

जर ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्यात आली नाही, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल आणि प्रशासनावर कारवाईची मागणी केली जाईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गर्शना खाली आगामी होणाऱ्या निवडणूक आढावा बैठक संपन्न.

हारून शेख महाराष्ट्र प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तसेच धाराशिव जिल्ह्याचे संपर्क मंत्री माननीय नामदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या उपस्थितीत परिमल मंगल कार्यालय धाराशिव येथे नगर परिषद, जिल्हा परिषद आणि…

You missed