अजित काळेल ( सातारा जि.संपादक )
पश्चिमबंगाल,आसाम,पुदुचेरी या तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात यश मिळाले याबद्दल कवठेमंकाळ भाजपच्या वतीने पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष उदयराजे भोसले म्हणाले ” हिंदू विरोधी सरकारच्या जाचातुन पश्चिम बंगाल मधील जनता सुटली. हा विजय फक्त भारतीय जनता पार्टीचा नसून संपूर्ण भारतीयांचा आहे,भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पश्चिम बंगाल आता सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पुढे जाणार पश्चिम बंगालमधील जनतेचे मी अभिनंदन करतो“
या कार्यक्रमासाठी उपस्थित जिल्हा सरचिटणीस अनिल लोंढे सर राज्य परिषद सदस्य मिलिंद बापू कोरे ,तालुका उपाध्यक्ष दिलीप झुरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अभिजीत शिंदे, सुमित कुलकर्णी,राकेश कोळेकर, सरचिटणीस रवी गाडवे, सुरेश घागरे, ज्येष्ठ नेते अजित कारंडे, प्रकाश येडगे, वैभव गुरव, राजाराम पाटील सर, अमित थोरात, सचिन गायकवाड, युवा नेते विक्रम कोळेकर, विजय शेजाळ, ओंकार पाटील, सज्जाद मुल्ला, महादेव वाघमारे, पांडुरंग जाधव, कायदा सेलचे संयोजक अरुण भोसले, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष शशिकांत पवार, निलेश काटकर, सचिन भोसले ग्रामपंचायत सदस्य नारायण बंडगर, सिद्धार्थ लोंढे, वैभव सरवदे,विशाल भोसले, मोठ्या प्रमाणात भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
